Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

‘हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम’ निमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत

Admin | 13 views
‘हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम’ निमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. २६: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात  ‘हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम’ निमित्त हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहिदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल.  ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, २ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर देखील पाहता येईल. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

‘हिंद दी चादर’श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड येथे अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग, महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रचार-प्रसार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू आहेत. मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत असताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, मानवता, करूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त  ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, २१ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तर, २४ जानेवारी २०२६ ला नांदेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे स्वरूप, अंमलबजावणी व राबविण्यात येणारे विविध उपक्रम याविषयी राज्यस्तरीय शहिदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

000

जयश्री कोल्हे/स.सं.


Join WhatsApp